‘ती’ माझ्या आयुष्यात असुन नसल्यासारखी…माझी तिची एकच भेट.. ती देखील ओझरती…मी शाळेतुन घरी जात होते आणि तेवढ्यात ती मला माझ्या आत्येभावाबरोबर दिसली. दादा बोलायला थांबला, अगदी २ मिनिटे. तिच्या चहर्यावर फक्त स्मितहास्य! ६वीत होते मी…
‘ती’ त्याची प्रेयसी! थोड्याच महिन्यात कळले की त्यांनी लग्न ठरवले आहे. BSc. नंतर दादा पुण्याला computer course करत होता. सुट्टीत तो घरी आला की आवर्जुन आमच्याकडे चक्कर मारत असे. माझे वडिल त्याचे लडके मामा. माझ्या वडिलांचे देखील या भाच्यावर विशेष प्रेम. माझे आणि माझ्या बहिणीचे तो खूप लाड करत असे. कुठे चॉकलेट, कुठे कंपास बॉक्स् तर कुठे अजुन काहीतरी. गप्पा होत तेव्हा मधेच कधीतरी तिचा उल्लेख होत असे.
दर भाऊबीजेला तो ओवाळणीसाठी येत असे. ते तिघे भाऊ. सख्खी बहिण नाही. त्या भाऊबीजेला तो पुण्यातच होता. २ दिवसांनंतर तो रत्नागिरीत आला. सकाळीच घरी आला आणि म्हणाला “आज करु आपली भाऊबीज, ओवाळा मला…”. माझी आणि माझ्या बहिणीची आंघोळ पण झाली नव्हती. पटकण आवरुन आम्ही त्याला ओवाळले. तो पर्यंत आईने त्यांना खायला दिले. त्याच्याबरोबर त्याचा मित्र होता. तो मित्र माझ्या वडिलांची कंपनी बघायला दादा बरोबर आला होता. घरुन ते दोघे कंपनीत जाणार होते. “तुम्ही मागून या.” असे सांगून वडिल पुढे कामावर निघाले. गप्पा गोष्टी करुन हे दोघे पण कंपनीला जायला निघाले. आणि वाटेत त्यांच्या मोटरसायकलचा अपघात झाला. दारु पिऊन ट्रक चालवणार्या वाहनचालकाचा ताबा सुटला आणि त्यांनी यांना जोरदार धडक दिली. माझा दादा त्याक्षणी गेला. त्याचा मित्र हॉस्पिटल मधे गेला. झाले त्यावर विश्वास बसेना. बरं, आमच्याकडे येऊन गेला ही सगळ्यात मोठ्ठी खंत. तो प्रसंगच महाभयानक होता. आत्या आणि काकांवर तर आभाळच कोसळले होते. शेजारी-शेजारी राहणारे दोन सख्खे मित्र एकत्र गेले. फार भयाण परिस्थिती होती ती. पोस्ट-मॉर्टम नंतर नातेवाईक मुंबईहून येइपर्यंत त्यांचे मृतदेह बर्फात ठेवले होते.
तिच्या घरी ही वाईट बातमी कळविण्यात आली. तिचा विश्वासच बसेना. तिने हॉस्पिटल मधे धाव घेतली. स्वत:च्या डोळ्यांनी बघून खात्री करायला. तिच्या दु:खाची कल्पना पण करवेना तेव्हाही आणि आत्ताही… तेव्हा तिला भेटण्याची खूप इच्छा झाली होती पण वय लहान होते. तो गेला ती एक भयाण पोकळी करुन – तिच्या, आमच्या सगळ्यांच्यातच! किती स्वप्नं रंगवली असतील तिने, लग्नाची, भावी सुखाची, सहजीवनाची… सगळी एका क्षणात मातीमोल झाली.
तो गेला तरी ती माझ्या आत्याकडे येत राहिली… आधार देत राहिली… आधार घेत राहिली. पुढे तिने शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षिकेची हंगामी नोकरी धरली. आत्या कडून तिची खबर-बात कळत असे. थोडे महिने नोकरी, थोडे महिने घरी असे तिचे सुरु होते. शाळेतल्या राजकारणाला ती बळी पडत होती. त्याने ती त्रस्त झाली होती. शेवटी तिने ती नोकरी सोडली.
काही वर्ष गेली तसे घरचे लग्नासाठी मागे लागले. ती काही ना काही सांगून टाळत होती. तो गेला तरी त्याच्या मधून ती बाहेर पडली नव्हती. नोकरी मिळेना, घरचे लग्नासठी खूप मागे लागत होते. शेवटी एके दिवशी तिने गळफास लावून आत्महत्या केली. हृदयाचा थरकाप करणारी ती बातमी होती. त्याच्याशिवय जगण्यापेक्षा तिने मरण स्विकारले. कित्ती भयानक शोकांतिका होती ही…एखाद्या कादंबरीत वाचावी तशी!
कित्ती मानसिक त्रासातून ती गेली असेल…कित्ती डिप्रेशन?…तिला मदत हवी होती का कुणाची?….इतके हतबल कुणी का होते? असे अनेक प्रश्न मनात साचले… ज्यांची उत्तरं मिळणे केवळ अशक्य!
ती माझ्या आयुष्यातून कायमची गेली… तिला भेटायची ईच्छा अपुरी राहिली…तिच्या आयुष्यासारखी…
*************
‘ती’ शृंखला -




ti…..aani tich tyachanantrche ekatepan ……..Ruhi tumhi kharach……dolyat pani aanlat,PREM……kiti sundar asat…aani kadhi……..etak dukhadhi………..
Ruhi.. this is so touching… Is this for real? Khoopach sunder lihila ahey tu… your writing is very powerful. angaavar kaata aala… kharach….
asach lihit jaa..
Ruhi…apratim lihilay….khup sunder…kahrach hya prashnanche uttar kunakadech nahi…